मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील दिग्गज गीतकार अनवर सागर यांचं 70 व्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी (दि 3 जून 2020) त्यांना मुंबईतील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. इथंच त्यांनी अखेरचा श्वसा घेतला. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी लिमिटेडनं गीतकार अनवर सागर यांचं निधन झाल्याची माहिती देत ट्विट केलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी लिमिटेडनं ट्विट केलं आहे की, “अनुभवी गीतकार आणि आयपीआरएसचे सदस्य राहिलेले अनवर सागर यांचं आज निधन झालं आहे. वादा रहा सनम सारखी गाणी लिहिण्यासाठी ते ओळखले जातात. विजयपथ आणि याराना अशा अनेक सिनेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”
Veteran lyricist and IPRS member Anwar Sagar has passed away. Known for writing songs like 'Vaadaa Raha Sanam', he also penned lyrics for iconic movies like #Vijaypath & #Yaraana. Our thoughts & prayers are with his family in this difficult time. May his soul #RIP.
— Indian Performing Right Society Limited (@IPRSmusic) June 3, 2020
अनवर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अनवर यांनी अक्षय कुमार आणि आयशा जुलका यांच्या खिलाडी सिनेमात वादा रहा सनम, अजय देवगण आणि तब्बू स्टारर विजयपथ आणि याराना अशा अनेक सिनेमाांसाठी गाणी लिहिली आहेत. वादा रहा सनम या गाण्यानं त्यांना खूप ओळख दिली. 90 च्या काळातील हे गाणं आजही खूप पसंत केलं जातं. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत या गाण्याचाही समावेश आहे.