माधुरीने तोडले करोडोंचे हृदय म्हणाली, ‘ते’ व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सौंदर्यवती आणि यशस्वी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बायोपिक येण्याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत आहे. यावर भाष्य करत खुद्द माधुरी दीक्षितने आता या वृत्तांचे खंडन केले आहे. माधुरीने सांगितले आहे की असे काहीही नाही. माधुरी दीक्षित नुकतीच कलंक या सिनेमात दिसली होती. हा सिनमात बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही.

शिवाय या सिनेमाच्या फ्लॉप होण्याविषयीदेखील माधुरीने भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मला या गोष्टीने काही फरक पडत नाही.” तुम्हाला सांगू इच्छितो की, हा सिनेमा 17 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात माधुरीसोबत संजय दत्त, वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांसारखे कलाकार दिसले होते. असेही दिसून आले की, सिनेमाला आपले बजेट वसूल करण्यातही अडचण आली आहे.

बायोपिकच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं सांगत माधुरी दीक्षित म्हणाली की, “माझ्या बायोपिक बनण्याची बातमी म्हणजे मी आतापर्यंत ऐकलेल्या सर्वात मोठ्या अफवांपैकी एक आहे. मला हे अजिबात माहिती नाही की, हे सगळं कसं सुरु झालं आहे. मला असे अजिबात वाटत नाही की, माझ्या आयुष्यावर सिनेमा किंवा बायोपिक बनावं. मला माझ्या आयुष्यात आणखी खूप काही करायचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अफवेवर लक्ष देऊ नका.”