श्रीदेवी यांच्या सोबत ‘ती’ भेट अखेरची ठरली – माधुरी दीक्षित 

मुंबई : वृत्तसंस्था – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. श्रीदेवी यांचं दुबईमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होत त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांना धक्का बसला होता. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. मात्र आता श्रीदेवी यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना अभिनेत्री माधुरी दीक्षितने त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

करण जोहरच्या आगामी ‘कलंक’ या चित्रपटामध्ये वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही तगडी स्टारकास्ट झळकून येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात बऱ्याच वर्षानंतर माधुरी आणि संजय दत्त एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात माधुरीच्या वाट्याला आलेली ही भूमिका प्रथम दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी साकारणार होत्या. मात्र त्यांच्या अकस्मित निधनामुळे ही भूमिका माधुरीच्या वाट्याला आली या भूमिकेविषयी बोलताना माधुरीने श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

यावेळी माधुरी म्हणाली, ‘२०१८ हे वर्ष बॉलिवूडमधील साऱ्याच कलाकारांसाठी धक्कादायक होतं. या वर्षात श्रीदेवी यांचं निधन झालं. मुळात त्यांचं निधन होणं ही गोष्ट माझ्या पचनीच पडली नाही. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच त्यांची ‘कलंक’ मधील भूमिका मला साकारायला मिळणार असल्याचं समजलं. हे ऐकल्यानंतर तर मी सुन्नच झाले.

श्रीदेवी यांच्या विषयी बोलत असताना माधुरीने त्यांची एक आठवणी शेअर केली. ‘फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या बर्थ डे पार्टीमध्ये आमची शेवटची भेट झाली. पार्टीमध्ये त्या त्यांच्या दोन्ही मुलींसोबत आल्या होत्या. या पार्टीत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता. मात्र ही भेट आमची शेवटची ठरेल असं तेव्हा चुकूनही वाटलं नाही. आयुष्य फार लहान आले. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा.

लवकरच माधुरी दीक्षितचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, आणि जावेद जाफरी हे कलाकार दिसणार आहे.