Video : भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्याबाबतीत उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून वातावरण चांगलच तापल असतानाच आता मध्य प्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर ( cabinet-minister-usha-thakur) यांनी मदरशाबद्दल एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. दहशतवादी (terrorists) हे मदरशामध्येच (madrasas) वाढले आहेत, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
All terrorists are raised in madrasas, they had turned J&K into a terror factory. Madrasas which can't comply with nationalism, they should be merged with existing education system to ensure complete progress of the society: Madhya Pradesh Minister Usha Thakur in Indore. (20.10) pic.twitter.com/1jQEgFBu2r
— ANI (@ANI) October 21, 2020
सर्व कट्टरवादी आणि दहशतवादी मदरशामध्ये शिकले आणि वाढले आहेत. जम्मू काश्मीरला दहशतवादाचा कारखाना बनवून सोडले होते, असे मदरसे जे राष्ट्रवादाशी (nationalism) समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊ शकत नाहीत. त्यांना आपल्याला योग्य शिक्षणाशी जोडून समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आणले पाहिजे. आसामने हे करून देखील दाखवले आहे. आसाममध्ये मदरसे बंद आहेत. राष्ट्रवादामध्ये अडचण निर्माण करणा-या सर्व गोष्टी बंद झाल्या पाहिजेत, शासकीय मदत बंद झाली पाहिजे, असे ठाकूर यांनी म्हटल आहे.
इंदूरमध्ये एका पत्रकार परीषदेचे आयोजन केले होते. त्यात ठाकूर यांनी म्हटल आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी डबरा विधानसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवार इमरती देवी यांचे नाव न घेता आयटम असा उल्लेख केला होता. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून कमलनाथ यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
तर मी का माफी मागावी कमलनाथाच्या या विधानावरून अनेकांनी निशाणा साधला आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया दिला आहे. राहुल गांधी यांनी कमलनाथ यांना या विधानाबाबत खडे बोल सुनावले आहेत. कमलनाथ यांनी वापरलेली भाषा आपल्याला अजिबात मान्य नाही. ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे, असे गांधी यांनी म्हटले आहे. गांधी यांनी खडे बोल सुनावल्यानंतरही कमलनाथ यांनी माफी न मागण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटल आहे. हे राहुल गांधीच मत आहे, असे म्हणत त्यांनी गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. हे गांधी यांचे मत आहे. वक्तव्य करतांना काय संदर्भ दिला होता, याच स्पष्टीकरण मी दिल आहे. त्यात आणखी काही सांगण्याच कारण नाही. माझा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तर मी का माफी मागावी, असे त्यांनी म्हटल आहे.