मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपादावर विराजमान झाले. महाविकास आघाडीचे सरकार येताच मागील सरकारने घेतलेल्या अनेक योजनांना या सरकारने ब्रेक लावला आहे. फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय ठाकरे सरकारने रद्द केले. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार या योजनेचे नाव बदलण्याच्या तयारीत ठाकरे सरकार असून, यावर सध्या चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जलयुक्त शिवार ही देवेंद्र फडणवीस यांची अतिशय महत्त्वकांक्षी योजना होती. या योजनेतून अनेक जिल्ह्यांना फायदा झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. मात्र, आता नव्या सरकारने ही योजना गुंडाळण्याची तयारी सुरु केली आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरकारने या योजनेला निधी न देण्याचा आदेश आधिकाऱ्यांना यापूर्वीच दिला. तर जलयुक्त शिवार योजनेची कामे करायची असतील तर ती रोजगार हमी योजनेतून करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
आता जलयुक्त शिवार या योजनेचे नाव देखील बदलण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. तर जलयुक्त शिवार ही योजना जरी चांगली असली तरी यामध्ये काही त्रुटी आहे. या योजनेबाबत अनेक तक्रारी येत असून, आम्ही यावर विचार करत आहोत. भविष्यात काय बदल करता येतील ते निश्चित करू असे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केले आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे