महाबळेश्वर खून प्रकरण; प्रेमसबंधातून आनंद चा खून; एकाला निगडी मधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील औंध मधील आनंद कांबळे या तरुणाचा खून महाबळेश्वर येथे शनिवारी झाला होता. मात्र हा खून लुटण्याचा प्रकरणातून झाल्याचं सांगण्यात येत असताना या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे.आनंद चा खून हा  प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून याप्रकरणी निखिल मळेकर याला महाबळेश्वर पोलिसांनी निगडी ओटा स्कीम येथून ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

आनंद कांबळे आणि दीक्षा ओव्हाळ यांचा विवाह दिनांक २० मे रोजी मोठ्या धुमधडाक्यात बाणेर येथे संपन्न झाला होता.त्यानंतर काही दिवसानीच ते महाबळेश्वर येथे पती आनंद आणि पत्नी दीक्षा हे त्यांच्या आणखी एका जोडीसह चारचाकी वाहनाने फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी महाबळेश्वर येथील पसरणी या घाटात प्रवास सुरु असताना पत्नी दिक्षाला उलट्या होऊ लागल्याने गाडी थांबविण्यात आली,रस्त्याच्या कडेला दोघे जण गेले.त्यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आनंदावर कोयत्याने सपासप वार केले,ही घटना दुसऱ्या जोडप्याने आपल्या डोळ्यांनी पहिली. मात्र हातात धारदार शस्त्र असल्याने हे काहीच करू शकले नाहीत.आनंद रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.यात आनंद चा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.परंतु लुटण्याचा बहाण्याने केलेला हा खून पुढे जाऊन वेगळेच वळण घेतले आहे.दीक्षा आणि संशयित आरोपी निखिल मळेकर यांचे प्रेम संबंध असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.यातून आनंदचा काटा काढल्याची चर्चा औंध मध्ये सुरू आहे.परंतु या कटामध्ये नववधू दीक्षा सहभागी आहे का याचा तपास पोलीस करत असून आणखी कोणी आरोपी मिळतोय का हे पाहणं महत्वाचं आहे.