अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यभरात प्रचार करण्यास सुरुवात केली असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडक शब्दात टीका केली.
यावेळी झालेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्यावर टीका करताना म्हटले कि, पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटायला लागला आहे. एका सामान्य नागपूरकराने पवारांची हि अवस्था करून ठेवल्याची खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी कोपरगावमध्ये घेतलेल्या सभेवेळी हि खरमरीत टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाजपने पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच महायुतीला विजयी करण्याचे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.
त्याचबरोबर या निवडणुकीत विरोधक कोण आहेत हेच कळत नसल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. राहुल गांधी यांच्यावर देखील त्यांनी यावेळी टीका केली. या निवडणुकीत महायुतीचा विजय नक्की असल्याचे देखील यावेळी भाषणात त्यांनी म्हटले. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची देखील वाईट अवस्था झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, राज्यात पुढील दहा ते पंधरा वर्ष आघाडीचे सरकार येणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. तसेच आम्ही शेतकऱ्यांची देखील कामे केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच आम्हाला दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा असल्याचे देखील त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.
Visit : Policenama.com
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम