तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी होऊ द्या ,मग सरकारवरील डागांचा हिशोब कळेल

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारवर कोणताही डाग नसल्याचा दावा केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे जोरदार  टीका केली आहे.  धडधडीत खोटं बोलताना मुख्यमंत्र्यांची जीभ कचरत कशी नाही? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री  फडणवीस यांना धारेवर धरताना मुंडे म्हणाले आहेत की , ‘मी स्वतः 16 मंत्र्यांचे 90 हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढले. तुम्ही मात्र क्लीनचिट मास्टर निघालात. हिंमत असेल तर तटस्थ यंत्रणेमार्फत चौकशी होऊ द्या. मग तुमच्या सरकारवरील डागांचा हिशोब कळेल. ‘

महोदय, तुमचं सरकार सर्वात कलंकित सरकार आहे. म्हणून तर प्रकाश मेहता यांना घरी जावं लागलं नाही का? खोटी कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा लोकायुक्तांनी ठपका ठेऊनही सुभाष देशमुख यांना मुख्यमंत्री महोदय तुम्ही मंत्रीपदावरून काढू शकला नाहीत. अजून बऱ्याच भ्रष्ट मंत्र्यांनी घरचा रस्ता पकडला असता, मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृपादृष्टीने त्यांना तारलं. असाही आरोप मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.

Visit : Policenama.com