Maharashtra Bandh | ‘महाराष्ट्र बंद’वरून अमृता फडणवीस अन् राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर ‘आमनेसामने’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना (Lakhimpur violence) गाडीखाली चिरडून ठार मारले होते. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील (MVA) तिन्ही पक्षांनी आज (सोमवारी) महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारला आहे. आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर (Maharashtra Bandh) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज वसुली सुरु आहे की बंद ? असा खोचक सवाल केला आहे. अमृता फडणवीस (amruta Fadnavis) यांच्या खोचक प्रश्नला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस या सक्रीय राजकारणात नसल्या तरी त्या ट्विटर किंवा इतर माध्यमातून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत असतात. लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदवरही त्यांनी टीका केली आहे. आज वसुली सुरु आहे की बंद ? असा खोचक सवाल करत त्यांनी महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच #MaharashtraBandhNahiHai असा हॅशटॅग अमृता फडणवीस यांनी वापरला आहे.

अमृता फडणवीस यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन (Perfect combination) म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्विट चाकणकर यांनी केलं आहे.

 

Web Title : Maharashtra Bandh | ncp leader rupali chakankar responds to amruta fadnavis criticism over maharashtra bandh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Bandh | अमृता फडणवीस यांचा खोचक सवाल; म्हणाल्या – ‘आज वसुली चालू आहे का बंद?’

Jio Haptik Technologies | 300% च्या वेगाने वाढतेय मुकेश अंबानी यांची ‘ही’ छोटी कंपनी, व्हॉट्सअप सुद्धा आहे पार्टनर

PUBG | ‘पब्जी’च्या आहारी गेलेल्या तरुणीने संपविले जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिले कारण