यंदाचं वर्ष हे महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचं वर्ष आहे. त्यामुळे राजपथावर संचलन करण्यासाठी सर्वच राज्यांना ‘गांधी’ हीच संकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्ये महात्मा गांधी या संकल्पनेवर आधारित कोणकोणते विषय चित्ररथावर साकारतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राने गेल्या वर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता.
विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राने केलेल्या याच चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तीन वर्षांपूर्वीही महाराष्ट्राने लोकमान्य टिळकांच्या कार्यावर आधारित चित्ररथ साकारला होता. 2016 साली महाराष्ट्राच्या या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला होता. दरम्यान यंदा मात्र सर्वच राज्यांना ‘गांधी’ हीच संकल्पना देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘छोडो भारत’ चळवळ ही यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम आहे. विविध राज्ये महात्मा गांधी या संकल्पनेवर आधारित कोणकोणते विषय चित्ररथावर साकारतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.