महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता विदर्भ कोरोनाचा सेंटर बनत आहे. विदर्भातून संक्रमण हळूहळू पुणे आणि मुंबईसारख्या शहरात पसरत आहे. जर हे नियंत्रित केले गेले तर देशातील इतर भागात कोरोना पसरला जाऊ शकतो, असे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सुमारे 8 हजार प्रकरणे समोर आले आहेत. गेल्या चार महिन्यांतील फक्त एका दिवसात सर्वाधिक प्रकरणे समोर आल्याचा हा एक रेकॉर्ड आहे. म्हणजेच गेल्या चार महिन्यात एका दिवसात 8 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आले होते. अधिकृत आकड्यांनुसार, महाराष्ट्रात आत्तापर्यंत 21,21,119 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की राज्यात दुसरी लाट आल्याचे आत्ताच सांगता येत नाही. मात्र, विदर्भातील नागपूर, अमरावतीपासून मराठवाड्यातील औरंगाबाद कोरोनाचे सेंटर बनत आहे. जर हे नियंत्रित झाले नाही तर हे देशातील इतर राज्यात पसरू शकते.

दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे तीन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे संरचना, उत्परिवर्तन आणि संचरणची क्षमता, दुसरे कोरोनाबाधित रुग्ण दुसऱ्या व्यक्तीकडून या व्हायरसचा फैलाव होणे, तिसरे म्हणजे पर्यावरण, हवामान, प्रदूषण आहे.

लॉकडाऊन शेवटचा पर्याय

या परिस्थितीपासून वाचण्यासाठी नव्या रणनितीची गरज नाही. कारण सध्याच्या रणनिती पुरेसे आणि प्रभावी आहेत. लॉकडाऊन शेवटचा पर्याय आहे. संपर्क-ट्रेनिंग आणि टेस्टमध्ये वाढ आणि अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये क्वारंटाईन करणे प्रमुख पाऊल आहे.