…म्हणून तेल लावलेला ‘पैलवान’ नागपूरला परतणार, काँग्रेसचा फडणवीसांना ‘टोला’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तेचा तिढा कायम असताना विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधला जातोय. शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेली असताना भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. एरवी अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकारची घोषणा देणाऱ्या भाजपला मात्र महाराष्ट्रात अबकी बार किसकी सरकार असा प्रश्न पडला असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

पाच वर्षे या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला तर बेरोजगारी देखील वाढवली. एरवी आम्ही जनतेच्या कामासाठी एकत्र आलो असल्याचे सांगणारे युतीतील नेते आता मात्र सत्तेच्या मुख्य पदांसाठी अडून बसलेले आहेत अशा शब्दात अतुल लोंढे यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

केंद्राने अवकाळी पावसाची पाहणी करण्यासाठी एकही पथक राज्यात पाठवलं नाही मात्र बहुमत मिळालेले पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्याच पक्षातील बहुजन नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला. यासाठी पंकजा मुंडे, तावडे, बावनकुळे तसेच खडसेंना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील केला गेला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी इतकी महत्वकांक्षा का ? असा सवाल देखील अतुल लोंढे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

घटनात्मक पेच सोडवण्यासाठी अनेक पक्षातील नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली होती. विधासभा विसर्जित होण्यासाठी थोडा काळ शिल्लक असताना भाजप नेमके काय पाऊल उचलणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके