5 वर्ष काय झोपा काढल्या ? अजित पवारांचा उध्दव ठाकरेंवर ‘घणाघात’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – उद्धव ठाकरेंच्या यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या  घोषणांवरुन अजित पवारांनी महायुतीवर  टीका केली आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी गेल्या 5 वर्ष काय झोपा काढल्या का ? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, ‘शिवसेना गेली 5 वर्ष झोपा काढत होती का ? गेल्या 5 वर्षात 10 रुपयांत का थाळी दिली नाही. गेल्या 5 वर्षात का कर्जमाफी दिली नाही. दोन्ही पक्षांचे मंत्री सरकारमध्ये होते, त्यांचंच सरकार होतं. पण, आजही महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. ‘
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणा –

गेल्या 5 वर्षात भाजपा सरकारमध्ये शिवसेना भागीदार होती. असे असतानाही दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर 10 रुपयांत पूर्ण अन्न,1 रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याना मोफत बस सेवा, 300 युनिटचा घरगुती वीज वापराचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार अशा महत्वाच्या  घोषणा केल्या.

Visit : Policenama.com