मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उद्धव ठाकरेंच्या यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणांवरुन अजित पवारांनी महायुतीवर टीका केली आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी गेल्या 5 वर्ष काय झोपा काढल्या का ? असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, ‘शिवसेना गेली 5 वर्ष झोपा काढत होती का ? गेल्या 5 वर्षात 10 रुपयांत का थाळी दिली नाही. गेल्या 5 वर्षात का कर्जमाफी दिली नाही. दोन्ही पक्षांचे मंत्री सरकारमध्ये होते, त्यांचंच सरकार होतं. पण, आजही महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. ‘
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणा –
गेल्या 5 वर्षात भाजपा सरकारमध्ये शिवसेना भागीदार होती. असे असतानाही दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर 10 रुपयांत पूर्ण अन्न,1 रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याना मोफत बस सेवा, 300 युनिटचा घरगुती वीज वापराचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार अशा महत्वाच्या घोषणा केल्या.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर