मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपात शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद राहील, असे निश्चित झाले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जवळपास एकमत झाले असून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून खलबते सुरू आहेत.
शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाविषयी आक्षेप नाही. संभाव्य कॅबिनेट मंत्र्याबाबत अद्याप चर्चा झाली नाही. तथापि, यावर समन्वय समिती ने चर्चा करण्याचे मान्य केले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात किमान समान कार्यक्रमाबाबत एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय