पुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून 5 कोटींची मदत
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स इंडस्ट्रिज आणि बिग बी अमिताभ बच्चन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा केली आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देत त्यांचे आभार मानले आहेत.
Thank you Reliance Industries Ltd for the contribution of ₹5 crore towards #CMReliefFund #MaharashtraFloods ! pic.twitter.com/GhA14nimlN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2019
रिलायन्स इंडस्ट्रिजने ५ कोटी रुपयांची तर अमिताभ बच्चन यांनी ५१ लाखांची मदत पूरग्रस्तांना केली आहे. याविषयी ट्विट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत की , ‘अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये ५१ लाख रुपये जमा केले आहेत. ही रक्कम सांगली, कोल्हापूर, सातारा याठिकाणी पूरग्रस्त भागातील मदत आणि योगदानासाठी अनेकांना प्रेरणादायी ठरेल. ‘
Thank you Amitabh Bachchan ji for your gesture of coming forward & contributing ₹51,00,000 towards #CMReliefFund #MaharashtraFloods
This will inspire many to help & contribute in our rehabilitation efforts for flood affected dists like Kolhapur, Sangli and Satara.@SrBachchan— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2019
पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार उडवला. पुरामुळे सर्वसामान्य माणूस, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकही उद्ध्वस्त झाला आहे. महापुरामुळे वीज, पाणीपुरवठा, संपर्क यंत्रणांसह रस्त्यांचीही मोठी हानी झाली. आतापर्यंत ६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
- रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
- गरोदर महिलांच्या ‘या’ सवयीमुळे मुलं बनतील स्मार्ट आणि इंटेलीजेंट
- झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
- हाय ब्लडप्रेशरला करा बायबाय, नाष्ट्यापूर्वी खावेत ३ खजूर, होतील ‘हे’ फायदे
- सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!
- चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या
- मूळव्याधीची ‘ही’आहेत ६ कारणे, हे सोपे ११ उपाय केल्यास मिळेल आराम
- अंगावर शहारे का येतात ? शरीरातील ‘या’ बदलांची ‘ही’ आहेत कारणे
- गरोदरपणात नियमित करा ‘या’ ५ गोष्टी, होईल नॉर्मल डिलेव्हरी
- गाजरचा ज्यूस प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे, आरोग्य राहील ठणठणीत, जाणून घ्या