भविष्यात याची ‘किंमत’ मोजावी लागेल, नाराज राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला ‘इशारा’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला. मात्र, या शपथविधी सोहळ्यासाठी घटकपक्षांचा विसर सरकारला पडला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा देखील महाविकास आघाडीला दिला आहे.

राजू शेट्टी यांनी ट्विट करून महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, ज्यांनी ईडी,इनकम टॅक्स,सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण आणि ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटकपक्ष मात्र शपथविधीला बेदखल, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

video: https://m.facebook.com/story.phpstory_fbid=2613620352008525&id=148479338522651

राज्य घटना आणि लोकशाही अढळ श्रद्धा असलेल्या छोट्या पक्षांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात मदत केली. यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. पण, ज्यांनी चौकशीचा ससेमिरा मागे लावला अशांना शपथविधीला बोलावण्यात आले. त्यामुळे निश्चितच भविष्यात याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/