मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच दर्जा उंचावण्यासाठी आता राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. महाराष्ट्र सरकार आता शैक्षणिक क्षेत्रात दिल्ली पॅटर्न राबवणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीतील शासकीय शाळांच्या धर्तीवर महापालिका शाळांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली आहे. याबाबतचे ट्विट देखील त्यांनी केले आहे.
दिल्लीतल्या विकसित सरकारी शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा विकास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत घेतला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. pic.twitter.com/lo0YPrfewJ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 13, 2020
सोमवारी मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान बोलताना दिल्लीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मॉडेल देशात चांगले असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात शिक्षण ही कायम सरकारची प्राथमिकता होती. वेगवेगळ्या उत्पन्न, समाज घटकापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवणे ही सरकारची प्राथमिकता असेल असे पवार म्हणाले. दिल्लीतल्या विकसित सरकारी शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा विकास करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सर्वप्रथम शिक्षणाचे हे दिल्ली मॉडेल मुंबईतील काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यातील इतर शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांमध्ये करण्यात येणार आहे. दिल्लीतील शाळांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –