राज्य सरकारने ७२ हजार जगासाठी नोकरभरती करणार अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. आता यातील पहिल्या टप्प्यातील ३६ हजार जागांसाठी या महिन्याच्या अखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. या साठी सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत. येत्या ३१ जुलै अखेर पर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. १७ जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती प्रत्येक विभागाच्या विभागप्रमुखांनी राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
[amazon_link asins=’B077V1P4T6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’903d631f-7f85-11e8-959d-177b0c930ff4′]
यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a3e4aad9-7f85-11e8-8a6f-79f3a11bcd88′]