काँग्रेस, राष्ट्रवादीची उद्या दिल्लीत ‘फायनल’ बैठक ? सत्तास्थानेचा तिढा सुटणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यासंबंधित दिल्लीत वेगाने हालचाली सुरु झाली आहेत. सोमवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक पार पडली मात्र या बैठकीत सत्तास्थापनेवरुन चर्चा झाली नसल्याचे पवारांनी सांगितले. परंतू आता उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
Meeting of Congress-NCP leaders to be held tomorrow evening in Delhi. NCP leaders Sharad Pawar, Praful Patel, Ajit Pawar and Congress leaders Ahmed Patel, Mallikarjun Kharge, Prithviraj Chavan, Ashok Chavan, and others will be present.
— ANI (@ANI) November 19, 2019
दोन्ही पक्षांच्या या बैठकीला सोनिया गांधी आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे प्रमुख नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खरगे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह काही महत्वाचे नेते उपस्थित असतील तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे उपस्थित असतील. यावेळी जर शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन केली तर आगामी येणाऱ्या निवडणुका कोणत्या मुद्यांवर लढवायच्या, तसेच या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत देखील चर्चा होऊ शकते.
सोमवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी 6 महिन्याचा कालावधी दिला आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहेत. तसेच शिवसेनेकडे 170 आमदारांचा पाठिंबा कुठून आला हे मला ठाऊक नाही, हे शिवसेनेच्या नेत्यांनाच विचारा.
राज्यातील शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस यांच्यात समन्वय समितीची बैठक झाली, या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झाली असेही सांगण्यात आले परंतू पवारांनी सांगितले की यावर अजूनही काहीही ठरलेले नाही, तर कॉमन मिनिमम प्रोग्रॉम कशासाठी करु, राज्यातील स्थितीबाबात चर्चा करण्यासाठी विधानसभा सदस्य म्हणून ते भेटले होते. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल की महाशिवआघाडीचे सरकार राज्यात स्थापनेला किती दिवस लागतील.
Visit : Policenama.com
- ‘या’ व्यायाम प्रकाराने लाभते दिर्घायुष्य, जाणून घ्या 5 आरोग्यदायी फायदे
- सतत ‘एनर्जी ड्रिंक’ घेतल्याने कमी होते मेंदूची कार्यक्षमता, ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा
- हिवाळ्यात ‘हे’ 6 आजार ठरू शकतात त्रासदायक, ‘हे’ उपाय आवश्य करा
- योगासने सुरु करण्यापूर्वी आणि नंतर ‘ही’ काळजी घ्या, लक्षात ठेवा ‘या’ 6 गोष्टी
- ‘हे’ आहेत थंड पाण्याचे 5 दुष्परिणाम आणि गरम पाण्याचे तब्बल 14 फायदे
- गुलाबी थंडीत असे सांभाळा तुमचे आरोग्य, ‘हे’ 7 पदार्थ आवश्य सेवन करा
- वजन घटवण्यासाठी ‘या’ 7 टिप्स, केवळ दररोज चालण्याने जळतील 500 कॅलरीज !