मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने जोरदार हालचाली करूनही सत्ता स्थापन करण्यात शिवसेनेला यश आले नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह अनेक नेते सहमत नव्हते मग त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधींना इशारा दिल्यानंतर सोनिया गांधींनी मवाळ भूमिका घेतल्याचे समजते.
शिवसेनेने भाजप आपल्याशी खोटं बोलत असल्याचे सांगत युतीमधून काडीमोड घेतला आणि राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्तेबाबतची बोलणी सुरु केली. त्यानंतर अनेक हालचाली झाल्या मात्र काँग्रेसचे समर्थनाचे पत्र मिळाले नाही म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही.
राज्यातील अनेक नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांना हे समजावण्याचा प्रयत्न केला की, जर आता योग्य निर्णय घेऊन आपण शिवआघाडी केली नाही तर राज्यातील काँग्रेस पूर्णपणे संपेल. यावेळी पृथ्वीराज चौहान, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील अशा अनेकांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा देखील केली. काँग्रेस आमदार देखील सत्तेत सामील होण्यासाठी इच्छुक असल्याचे समजताच सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी फोनवरून चर्चा केली.
पवार आणि सोनिया गांधी यांच्या चर्चे नंतर सोनिया गांधी यांनी मवाळ भूमिका घेतली आणि शिवआघाडीत जाण्याचे जवळजवळ निश्चित केले. त्यानंतर याबाबत दिल्लीतून घोषणा होणार असल्याचे देखील समजते.
Visit : Policenama.com
- मन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या
- सौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का ? जाणून घ्या
- कामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा
- आनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा
- कामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- फिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा !
- ‘या’ 5 कारणांमुळे महिलांना अकाली मृत्यूची जास्त शक्यता, जाणून घ्या