ठाकरे सरकारनं दिली विमान सेवेला मंजूरी ! एका दिवसात फक्त 25 फ्लाईट करतील ‘टेक ऑफ’ अन् ‘लॅन्ड’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सरकारने हवाई प्रवाश्यांची संख्या निश्चित करून देशांतर्गत उड्डाणे करण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी (24 मे) सांगितले कि , “राज्य सरकारने दररोज मुंबईतून उड्डाण करणाऱ्या आणि येथे उतरण्यासाठी 25 प्रवाश्यांची संख्या निश्चित केली आहे. हळूहळू प्रवाशांची संख्या वाढविली जाईल.” यासह ते म्हणाले की, सरकार लवकरच या संदर्भात तपशील आणि मार्गदर्शक सूचना जाहीर करेल. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हवाई नागरी उड्डाण सुरू करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे जास्त वेळ मागितल्याचे समजते. ते म्हणाले की, विषाणूचा फैलाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 मे रोजी संपेल, हे सांगू शकत नाही.
Maharashtra govt has agreed to allow 25 take offs and 25 landings everyday for domestic flights from Mumbai. This number will be increased gradually. State govt will issue details and guidelines in this regard soon: Maharashtra Minister Nawab Malik. (File pic) pic.twitter.com/VnctP8YpK5
— ANI (@ANI) May 24, 2020
देशांतर्गत विमानतळ पुन्हा सुरू करण्याच्या एक दिवस आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले होते की, “आज सकाळी मी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी बोललो आणि त्यांना देशी विमानाच्या तयारीसाठी अधिक वेळ मागितला आहे. वास्तविक, देशातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा थांबविण्यात आल्या. देशांतर्गत विमान सेवा 25 मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे.
अचानक लॉकडाउन लादणे चुकीचे होते : ठाकरे
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी अचानक लॉकडाउन लादणे चुकीचे असल्याचे सांगितले आणि आता ते त्वरित काढता येणार नाही. महाराष्ट्रात कोविड – 19 प्रकरणांच्या वाढत्या काळात ठाकरे म्हणाले की, येत्या पावसाळ्यात अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. त्यांनी टीव्हीवर प्रसारित संदेशात म्हंटले कि, “अचानक लॉकडाउन लादणे चुकीचे होते. त्वरित काढून टाकणे तितकेच चुकीचे ठरेल. आमच्या लोकांसाठी हा दुहेरी झटका ठरेल. “