Pune News : शेतकरी आंदोलनांबाबत मंत्री छगन भुजबळांनी भारतातील सेलिब्रिटींना दिला ‘हा’ सल्ला (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. तर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत परदेशातील कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिल्यानंतर, भारतीय कलाकारांनी आतंरराष्ट्रीय कलाकारांना फटकारले आहे. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करणाऱ्या रिहानाविरोधात अनेक बॉलिवूड कलाकारांनी भूमिका घेतली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, भारतीय नागरिक म्हणून मी कलाकारांच्या मतांचा आदर करतो. भारतीय कलाकार सांगताहेत की हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. मग तुम्ही तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला. तुमच्या देशाचा प्रश्न आहे तर आधी तुम्ही बोलते व्हा. मग परदेशातील कलाकारांना बोला, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. तसेच पुढे म्हणाले, कटारी सीमेवर खिळे ठोकण्यात आलेत हेच जर चीनच्या बॉर्डवर केलं असतं तर त्यांनी गाव वसवलं नसतं. शेतकरी आपले काही दुष्मन नाही ते आपले अन्नदाते आहेत,’ असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

बाबत भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे, शर्जिल उस्मानी यांच्या भाषणामुळं मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. भाजपनं शर्जिलला अटक करण्याची मागणी केली असून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. असे ते म्हणाले, तर ‘बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे, कधीही कोणावर टीका करताना, धर्माबाबत बोलताना शब्दांच्या बाबतीत जागृत राहणे गरजेचे आहे, बोलताना शब्द जपून वापरायला हवेत, शर्जिलला मनुवादावर बोलायचे होते, पण शब्द जपून वापरायला हवे, तसेच शर्जिलवर कोणते कलम लावायचे हा पोलिसांचा प्रश्न आहे, पोलीस चौकशी करुन योग्य ती कारवाई करतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.