NCRB चा अहवाल : राज्यातील वृध्द सर्वाधिक असुरक्षित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून महाराष्ट्रातील वृद्ध सर्वाधिक असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. एनसीआरबीने २०१९ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण २७ हजार ६९६ गुन्हे नोंद करण्यात आले. इतर राज्यांच्या तुलनेत जेष्ठांवरील अत्याचारात महाराष्ट्र पुढे आहे. महाराष्ट्रात ६ हजार १६३ गुन्हांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश ४ हजार १८४, गुजरात ४ हजार ८८ आणि तामिळनाडू २ हजार ५०९ अशी नोंद करण्यात आली आहे.

तथापि, महाराष्ट्रात २०१७ साली ५ हजार ३२१ तर २०१८ मध्ये ५ हजार ९६१ गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच मुंबई शहरात वृद्धांवरील अत्याचाराचे एकूण १ हजार २३१ गुन्हे नोंदवण्यात आले.

महाराष्ट्रात २०१९ साली घडलेले गुन्हे

>> १५८ वृद्धांची हत्या

>> १० दरोडे घालण्याच्या घटना समोर आल्या.

>> २ हजार ०५१ गुन्हे हे वृद्धांना लक्ष्य करुन चोरी केल्याप्रकरणी दाखल झाले.

>> ३२५ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली.

>> ४३ विनयभंगाचे तर जेष्ठ महिलेवर बलात्काराचे २ गुन्हे समोर आले.