Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शक्तीशाली प्रदर्शनापुढे आणि त्यांना असलेल्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मात्र चांगलीच गोची झाली (Maharashtra Political Crisis) आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात मोठा दबदबा निर्माण केला आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी खळबळजनक ट्विट केलं आहे.

 

“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देणार असल्याचे संकेतच संजय राऊत यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होईल. त्यामुळे राजकारणात एक प्रचंड मोठी घडामोड घडण्याची शक्यता असल्याचं चित्र समोर दिसत आहे. (Maharashtra Political Crisis)

 

आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन मंत्रीपद हटवलं –

शिवसेनेचे युवा नेते आणि आघाडी सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Twitter Bio) यांनी ट्विटरवरुन मंत्री पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमधून पर्यावरण मंत्री हा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे याबद्दलच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.

उद्धव ठाकरे राजीनामा देणार ?

एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड पुकारला आहे. शिवसेना आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आसामच्या गुवाहटीमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्याचबरोबर जवळपास निम्म्याहून अधिक शिवसेना आमदार हे एकनाथ शिंदेसोबत असल्याने ते भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करू शकतात. याच घडामोडींना वेग आला आहे. हे सर्व पाहता उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची चर्चा मात्र जोर धरताना दिसत आहे.

 

एकनाथ शिंदे गुवाहटीत –

विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाला. त्याच रात्री राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारा बंड शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी पुकारला.
त्यानंतर मंगळवारी सूरतमध्ये घडलेल्या सर्व राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदेंसह जवळपास 35-40 आमदारांना गुवाहटीला हलवण्यात आले आहे.
सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 45 आमदारांचा पाठिंबा असून हे संख्याबळ 50 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | Will Uddhav Thackeray resign as Chief Minister Shiv Sena leader Sanjay Rauts sensational tweet Said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा