नागपूरचं ‘बाेचकं’ परत पाठवा, खा. अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याकडे शाळेत नापास झाले की बापाला बोलावले जाते. तशीच अवस्था सध्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मोदी-शाह महाराष्ट्रात येत आहेत. हे नागपूरचे बोचकं परत नागपूरला पाठवा, असे आवाहन करून खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला.

कर्जत – जामखेडच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी येथे आलेले
पार्सल परत पाठवा, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना खासदार कोल्हे हे मिरजगाव येथील सभेत बोलताना म्हणाले की, गेल्या 5 वर्षांची स्वतःचीच कारकीर्द पाहून मुख्यमंत्र्यांना प्रश्न पडला असेल, की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे. त्यामुळे नागपूरचे बोचकं परत नागपूरला पाठवा. मुख्यमंत्री पदाचा आदर आहे.

मात्र, फडणवीस हे पुढून मागून कसेही बघितले तर पैलवान दिसत नाहीत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र, आमच्यासोबत लढायला कोणीच नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्यालाही कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी