शाह-पवार यांच्या ‘कथित’ भेटीमुळे उद्भवले प्रश्न; त्यांच्या उत्तरात दडला राजकीय ‘गणित’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळापासून चालू असलेल्या हालचालींमध्ये एक ‘कथित भेट’ चर्चेचा विषय बनत आहे. भाजेपचे प्रदाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा आहे की NCP चे प्रमुख शरद पवार, त्याचे सहयोगी प्रफुल्ल पटेल यांनी २६ मार्चच्या रात्री अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा केला नाही की या बैठकीत बिजनेसमॅन गौतम अडाणी यांचा समावेश होता की नाही.

परंतू चंद्रकांत पाटलांना या बैठकीशी संबंधित व्यक्तीनेही बैठकीच्या संदर्भात कोणतीही स्पष्ट केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हंटले आहे की सर्व गोष्टी सार्वजनिक सांगितल्या जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे NCP चे प्रमुख शरद पवार ज्यांची तब्बेत खराब आहे, त्याच्या वतीनेही काही वक्तव्य केले गेले नाही.

या बैठकीत समाविष्ट असणारे प्रफुल्ल पटेल हे ऑन रेकॉर्ड या बैठकीबाबत काही बोलले नाहीत. तथापि सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी गौतम अडाणी यांची भेट घेतली आहे. परंतू अमित शाह याच्यासोबत भेट घेण्याचे काहीच नक्की नाही. सूत्रांच्या दाव्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी असा दावा केला आहे की अशी कोणतीही बैठक झालेली नाही.

याखेरीज जर अशी बैठक झाली असेल तर त्यामागील कारण काय असू शकते? हे पाहणे आवश्यक आहे. राजकारणात बहुतेकदा असे घडते की पक्ष आणि विरोधी पक्ष नेते कधीही भेटतात आणि अनेक मुद्यांवर विचार मंथन करतात.

खासकरून शरद पवारांचे राजकरण असे आहे की ते आपले दरवाजे कोणलाही बंद करत नाहीत. मग ते अहमद पटेल असो अथवा रामदास आठवले किंवा बाळ ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींसारखे दिग्गज.

ही बैठक का झाली?
२०१९ मध्ये शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणून सरकार स्थापन करण्याचा विचारमंथन करीत होते, त्याचवेळी NCP चा वेगळ्या पातळीवर भाजपशी संपर्क होता. त्याचा परिणाम असा की अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केल्याचे दिसून आले होते. सरकार स्थापन करणे किंवा बिघडवण्यापर्यंत BJP आणि NCP ने कोणत्याही प्रकारची भनक लागू दिली नाही.

परंतू यावेळी परिस्थिती वेगळी दिसत आहे कारण भेट होण्याआधी काही वेळातच सर्व गोष्टी समोर येत होत्या. ज्यामुळे असे मानले जात आहे की NCP च्या वतीने महाराष्ट्र विकास आघाडीला इशारा आहे की काहीही होऊ शकते. ते ही सचिन वाजे प्रकरणानंतर काँग्रेस-शिवसेना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यावर आडून आहेत आणि शरद पवार त्यांच्या मंत्र्यांसोबत आहेत.

शरद पवार त्याच वाटेने जातील का?
आतापर्यंत फक्त २०१४ मध्ये असे झाले आहे, जेव्हा शरद पवार यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये जाण्याची भाषा केली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना-भाजपच्या वादात बाहेरून पाठिंबा देण्याचे म्हंटले होते. या संधीशिवाय शरद पवार यांनी गांधी कुटुंबाशी वाद असूनही काँग्रेसबरोबर जाणे नेहमीच योग्य मानले आहे.

वयाच्या या टप्प्यावरही, जेव्हा शरद पवारांनी महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे धागेदोरे जुळवले तेव्हा त्यांच्या रणनीतीचा प्रतिध्वनी देशभर गाजला. पण आता शरद पवार पुन्हा भाजपबरोबर जाऊन ही प्रतिमा त्यांना फोडायला आवडेल का?

शरद पवार आणि भाजपा कधीही एकत्र येऊ शकतात, असे भाजपमधील बरेच लोक सांगतात कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांना त्यांच्या मुलीसाठी दिल्लीमध्ये मंत्रिपदाची सोय करायची आहे, जेणेकरून पक्ष पुढे जाऊ शकेल. पण शरद पवारांना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्ह्णून पहायचे नाहीत. जर भाजपने ही अट मान्य केली तर ते दिवस फार दूर नाहीत जेव्हा हे दोन्ही पक्ष एकत्र येतील.

परंतू हे सर्व असूनही शरद पवार या वयात तेच पाऊल उचलतील जे आतापर्यंत त्यांनी उचलले नाही परंतू तरीही त्याचा संशय नेहमी त्यांच्यावर घेतला गेला आहे.

बहुतेक वेळा असे पहिले गेले आहे की युतीचे सरकार तेव्हाच पडते जेव्हा त्यांच्या सोबतचा हा विचार करतो की सरकारमध्ये असूनही त्यांचे ध्येय साध्य झाले नाही. परंतू शॉर्ट टर्म पॉलिटिक्सच्या काळात बाजू पालटणे फार मोठी गोष्ट नाही. परंतू सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षाचे समान लक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे हे आहे असे दिसते. जोपर्यंत हे लक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासन विकास आघाडी चालवू शकते. तोपर्यंत अशा बैठकींचे बरेच अर्थ निघू शकतात.