Maharashtra Politics | जयंत पाटील यांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘दर 15 दिवसांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीला जावे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्लीला जरी जात असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशिवाय त्यांना दिल्लीत अपॉइमेंट मिळणे कठीण आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली होती. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Maharashtra State President Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, प्रत्येक महिन्याला किंवा 15 दिवसाला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला गेले पाहिजे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी केंद्राची मदत लागेल. केंद्राच्या मदतीशिवाय कुठलेही राज्य पुढे जाऊ शकत नाही. (Maharashtra Politics)

 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत प्रचंड वजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी बैठका घेतलेल्या आहेत. जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील ते मोदींनी देऊ असे सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे आणि फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. (Maharashtra Politics)

 

राष्ट्रवादीवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, केंद्राची मदत यांनी घेतली नाही. महाराष्ट्राची अडीच वर्ष खराब केली. अडीच वर्ष महाराष्ट्र विकासापासून वंचित ठेवला. केंद्र जोपर्यंत पूर्ण मदत करत नाही तोपर्यंत राज्य पुढे जाऊ शकत नाही. एकनाथ शिंदे हे विकासकामे करणारे मुख्यमंत्री आहेत. विकास मागणारा मुख्यमंत्री जर पंतप्रधानांना, केंद्रीय नेतृत्वाला भेटत असेल तर यांना कुठे तोंड फुटलेय? अडीच वर्षात यांनी काय केले? मोदींनी त्यांना थांबवले होते का?

बावनकुळे पुढे म्हणाले, मी तर असे म्हणेन की शिंदे आणि फडणवीस मोदींना भेटून
महाराष्ट्राच्या विकासाची योजना तयार करत आहेत याचा आम्हाला आनंद आहे.
मला वाटते त्यांनी आता जरा शांत बसले पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांच्या विकासाच्या बुलेट ट्रेनचा आराखडा बघितला पाहिजे.

 

Web Title :- Maharashtra Politics | bjp chandrashekhar bawankule replied ncp jayant patil over criticism on eknath shinde and devendra fadnavis about delhi visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का?, अजित पवारांच्या प्रश्नाला बावनकुळेंचा रोखठोक सवाल

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’