Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 10221 जण झाले ‘कोरोना’मुक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसविरूध्द लढण्यासाठी शासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 10221 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणावर बरे होत असल्यानं राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळत आहेत. दरम्यान, दिवसभरात कोरोनाचे 8968 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून 266 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 50 हजार 196 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये तब्बल 2 लाख 87 हजार 30 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये 1 लाख 47 हजार 18 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी तब्बल 41 हजार 664 रूग्ण हे एकटया पुणे जिल्हयातील आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 15842 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई आणि आता पुण्यात जम्बो रूग्णालयाची तातडीनं उभारणी करण्यात येत आहे. एकटया पुण्यात 41 हजार 664 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह असले तरी पुण्यातील रिकव्हरी रेटमध्ये देखील वाढ होत आहे.