Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच ! गेल्या 24 तासात 55 हजारांपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 309 रूग्णांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. यापुर्वीच सरकारने संपुर्ण राज्यभर कठोर निर्बंध लावले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 55 हजार 411 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात 309 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात तब्बल 53 हजार 5 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 33 लाख 43 हजार 951 वर जाऊन पोहचला आहे. त्यापैकी 27 लाख 48 हजार 153 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळं राज्यातील तब्बल 57 हजार 638 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 5 लाख 36 हजार 682 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.