Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा ‘कहर’ ! गेल्या 24 तासात 67 हजारांपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 419 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा संपुर्ण राज्यात हाहाकार सुरू आहे. मुंबई आणि पुण्यासह इतर मोठया शहरांमध्ये कोरोनाने अक्षरशः कहरच केला आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 67 हजार 123 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर दिवसभरात तब्बल 419 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यातील 56 हजार 783 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या राज्यामध्ये कोरोनाच्या एकुण 6 लाख 47 हजार 933 अ‍ॅक्टीव्ह केसेस आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं 59 हजार 970 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 30 लाख 61 हजार 174 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 81.18 टक्के आहे. राज्यात कोरोना रूग्णाचा मृत्यू दर हा 1.59 टक्के आहे. राज्यात सध्या 35 लाख 72 हजार 584 जण हे होम क्वारंटाइन झाले आहेत.