Exit Poll : साताऱ्यातून धक्कादायक निकाल !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यानुसार राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीत युती बाजी मारणार असे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत सेना-भाजपच्या युतीला 192 ते 216 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडा गाठता आलेला नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातली दोन्ही राजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यात शिवेंद्रसिंह हे विधानसभा निवडणूक लढवत होते. तर उदयनराजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानं या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने श्रीनिवीस पाटील यांना उमेदवारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील सभा घेतली होती. ही सभा वादळी ठरली होती. या सभेत त्यांनी लोकसभेत चुक केली आता ती सुधारत आहे असं म्हणत शरद पवार यांनी मतदारांना भावनिक साद घातली होती. सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने दीपक पवार यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला असला तरी या ठिकाणी नागरिक राज घराण्याच्या पाठिशी आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीला जड जाणार होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत सातारा जागेवर अटीतटीची लढत झाल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यामुळे राजे बाजी मारणार की राष्ट्रवादी गड राखणार हे 24 तारखेला स्पष्ट होईल.

Visit  :Policenama.com