मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये आणि नवीन रुग्णांचे प्रमाण यात आजही मोठी घट झाली आहे. आज (बुधवार) 32 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात 2 हजार 171 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2 हजार 556 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 2171 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2556 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1920006 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 43393
ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.26% झाले आहे.#CoronaVirusUpdates— Rajesh Tope (@rajeshtope11) January 27, 2021
आजपर्यंत राज्यात 20 लाख 15 हजार 524 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात 19 लाख 20 हजार 006 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.26 टक्के इतके झाले आहे. तर राज्यात सध्या 43 हजार 393 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
Maharashtra reports 2,171 new COVID-19 cases; tally rises to 20,15,524; toll up to 50,894 as 32 die: Official
— Press Trust of India (@PTI_News) January 27, 2021
राज्यात आज एकूण 32 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजर्पंयत 50 हजार 894 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी राज्यात 47 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.53 टक्के इतका आहे.