Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 2771 नवीन रुग्ण, 56 जणांचा मृत्यू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून वाढत असताना मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात आज 56 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 2 हजार 771 नवीन रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 2771 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2613 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1925800 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 43147
ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.28% झाले आहे.#CoronaVirusUpdates— Rajesh Tope (@rajeshtope11) January 29, 2021
राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत चढ उतार होताना दिसत आहे. गेले काही दिवस कोरोना रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत होता. तर गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. आज राज्यात 56 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत 51 हजारपर्यंत कोरोना बळींचा आकडा पोहोचला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.52 टक्के इतका झाला आहे.
गेल्या 24 तासांत 2 हजार 771 रुग्णांची भर पडली असून आजपर्यंत कोरोना बाधितांच्या रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 21 हजार 184 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 2 हजार 613 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 19 लाख 25 हजार 800 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.28 टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या 43 हजार 147 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.