Coronavirus : चिंतेत वाढ ! राज्यात 50 हजारांच्यावर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज 70 कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 009 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या राज्यात 52 हजार 365 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आता लसीकरणाची तयारी करण्यात येत असली तरी राज्यातील कोरोनाची परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. आज राज्यात 3009 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत रुग्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18 लाख 74 हजार 279 इतकी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के एवढे आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी बाधित रुग्णांचा आकडाही काहींसा चिंता वाढवणारा आहे. आज राज्यात 3 हजार 556 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 78 हजार 044 इतके झाले आहे. तर राज्यात सध्या 56 हजार 365 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 50 हजार 221 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर 2.54 टक्के एवढा आहे.