Coronavirus : राज्यात दिवसभरात 5339 ‘कोरोना’ रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 95.71 %
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाबाबत आज (गुरुवार) राज्यात 5339 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज राज्यात एकूण 2 हजार 736 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.71 टक्के इतके झाले आहे.
Maharashtra reports 2736 new #COVID19 cases, 5339 discharges and 46 deaths today.
Total cases 20,36,002
Total recoveries 19,48,674
Death toll 51,215Active cases 34,862 pic.twitter.com/7bJ9SMODqg
— ANI (@ANI) February 4, 2021
आज दिवसभरात राज्यात एकूण 46 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काल (बुधवार) राज्यात 30 रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यात आजपर्यंत 51 हजार 215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.52 टक्के इतके आहे. तर राज्यात आजपर्यंत 19 लाख 48 हजार 674 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.71 टक्के इतके झाले आहे.
राज्यात सध्या 34 हजार 862 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 48 लाख 21 हजार 561 प्रयोशाळा नमुन्यापैकी 20 लाख 36 हजार 002 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.74 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 1 लाख 78 हजार 676 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 911 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.