Coronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 3145 नवीन रुग्ण, 45 जणांचा मृत्यू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. शुक्रवारी (दि.15) दिवसभरात 3 हजार 145 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या एकूण 3 हजार 500 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 18 लाख 81 हजार 088 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारी नुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.78 टक्के इतके झाले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 84 हजार 768 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 52 हजार 152 ॲक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात सर्वाधिक ॲक्टिव्हरुग्ण पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्यामध्ये 15 हजार 777 ॲक्टिव्ह केसेस आहेत. पुण्यानंतर ठाण्यात 9 हजार 799 तर मुंबईत 7 हजार 107 आणि नागपूरमध्ये 4 हजार 998 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
Maharashtra reports 3,145 new COVID-19 cases, tally increases to 19,84,768; death toll reaches 50,336 with 45 fatalities: health official
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2021
राज्यात आज 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 50 हजार 336 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.54 इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत. मुंबईत 11 हजार 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात 7851 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात 5 हजार 669 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 36 लाख 84 हजार 589 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 19 लाख 84 हजार 768 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.50 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 24 हजार 851 होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 240 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 3,145 new #COVID19 cases, 3,500 recoveries and 45 deaths today.
Total cases: 19,84,768
Total recoveries: 18,81,088
Death toll: 50,336
Active cases: 52,152 pic.twitter.com/YN5tjVg8pi— ANI (@ANI) January 15, 2021