मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. रविवारी (दि.17) दिवसभरात 3 हजार 081 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या एकूण 2 हजार 342 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 18 लाख 86 हजार 469 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारी नुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के इतके झाले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 90 हजार 759 वर पोहचली आहे. सध्या राज्यात 52 हजार 653 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत 50 हजार 738 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.54 इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये झाले आहेत.
लसीकरणासाठी नाव नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन वेळा फोनवरुन आणि तीन वेळा एसएमएस पाठवून लसीकरणाची आठवण करुन दिली जाणार आहे. मात्र, त्यानंतरही एखादी व्यक्ती लसीकरणासाठी आली नाही तर ती व्यक्ती लस घेण्यास उत्सुक नाही, असे समजून त्याचे नाव लसीकरणातून बाद करण्यात येणार असल्याची माहिती, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
राज्यात आज 3081 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2342 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1886469 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 52653 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.76% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 17, 2021
Maharashtra reports 3081 new #COVID19 cases, 2342 discharges, and 50 deaths today
Total cases – 19,90,759
Total recoveries – 18,86,469
Death toll – 50,738Active cases – 52,653
— ANI (@ANI) January 17, 2021
Maharashtra's COVID-19 tally reaches 19,90,759 with 3,081 fresh cases; 50 deaths take toll to 50,438: state health department
— Press Trust of India (@PTI_News) January 17, 2021