Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 48,211 रूग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 90.19 %
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात 1 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसू लागला आहे. मागिल काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात आजही (सोमवार) नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात गेल्या 24 तासात 26 हजार 616 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 हजार 211 रुग्ण बरे झाले आहेत.
Maharashtra reports 26,616 new #COVID19 cases, 48,211 recoveries and 516 deaths in the last 24 hours.
Total cases 54,05,068
Total recoveries 48,74,582
Death toll 82,486Active cases 4,45,495 pic.twitter.com/6YBuyCaP85
— ANI (@ANI) May 17, 2021
गेल्या 24 तासात राज्यात 48 हजार 211 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 48 लाख 74 हजार 582 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19 टक्के आहे. रुग्ण बरे होत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 516 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 82 हजार 486 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.53 टक्के आहे.
सध्या राज्यामध्ये 4 लाख 45 हजार 495 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 76 हजार 160 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 13 लाख 38 हजार 258 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54 लाख 05 हजार 068 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 17.25 टक्के आहे. सध्या राज्यात 33 लाख 71 हजार 258 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 28 हजार 102 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.