राज्यात विचाराधीन ‘Unlock ‘साठी 5 टप्पे; तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात ? काय सुरू अन् काय बंद हे जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक झाली. त्यानंतर घेतलेल्या परिस्थितीच्या आढाव्यावरून राज्य सरकारच्या समोर राज्यात हळूहळू अनलॉक  करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. महाराष्ट्रात आता अनलॉक केलं जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. 5 टप्प्यात अनलॉक होणार आहे. आता तुमचा जिल्हा (District) कोणत्या टप्प्यात येतो ते सविस्तर जाणून घ्या.

पहिला टप्पा : 18 जिल्हे (District) –
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ आणि धुळे

काय सुरु ?
रेस्टॉरंट्स, मॉल्स, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, खासगी आणि सरकारी कार्यालयं, थिएटर्स, चित्रपटांचं चित्रीकरण, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा, सर्व प्रकारची दुकानं हे पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरा टप्पा : 5 जिल्हे – अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार

काय सुरु, काय बंद ?
यामध्ये पहिल्या स्तराप्रमाणेच मुभा असेल फक्त यात 50 टक्के क्षमतेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेनं हॉटेल सुरु असतील. मॉल चित्रपट गृह 50 टक्के क्षमेतेने सुरु असतील. दरम्यान, मुंबईची लोकल मात्र सुरु असणार नाही. सार्वाजिनक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवागनी असेल. शासकीय आणि खासगी सगळी कार्यालय खुली असतील. क्रीडा सायंकाळ सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु असतील.

तिसरा टप्पा : 10 जिल्हे (District) – अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर

काय सुरू, काय बंद ?
या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक Unlock सध्या करण्यात येणार नाही. पण निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवारी आणि रविवारी इतर दुकानं बंद राहणार आहेत.

चौथा टप्पा : 2 जिल्हे – पुणे आणि रायगड

काय सुरु, काय बंद ?
या ठिकाणी सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत.
अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु असतील.
सरकारी खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल.
क्रीडा, मैदानांवर सकाळी 5 ते 9 पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु राहतील.
सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे.
अंत्ययात्रेला 20 लोक उपस्थित राहू शकणार आहेत.

पाचवा टप्पा : यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि प्राणवायू बेड हे 75 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात व्यापलेले असतील त्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये टाकलं जाईल. याठिकाणी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…