बाळासाहेब थोरातांवर आशिष देशमुखांचा घणाघात, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निडवणुका जवळ आल्या आहेत. राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आता काँग्रेसचे विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर देत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि 5 कार्याध्यक्षांवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नाही असेच यावरून दिसत आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आशिष देशमुख म्हणाले की, “प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे केवळ संगमनेरपुरतेच कार्याध्यक्ष आहेत की काय अशी चर्चा सुरु आहे.” थोरात यांच्यावर टीका करतानाच देशमुख यांनी निडवण्यात आलेल्या 5 कार्याध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त करत टीका केली. भाजपची विचारसरणी ही संघाची आहे. त्यावर गोवळकर, हेडगेवार यांच्या विचारांचा पगडा आहे. हे विचार देशाच्या किती उपयोगी आहेत हा प्रश्न आहे असेही ते म्हणाले.

सध्या काँग्रेस पक्षात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पक्ष सोडण्याचा विचार करताय काय ? असा प्रश्न विचारला असता पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही असे सांगत देशमुख म्हणाले की, “मी काँग्रेससोबत राहीन. समाज कार्य करताना निवडणूक लढवणे गरजेचे नाही.” असे म्हणत त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रश्नावर संभ्रम कायम ठेवला.

Visit : Policenama.com