बीडमध्ये शफीकभाऊ औरंगाबादची पुनरावृत्ती करणार – खा. ओवेसी
मजलिसला साथ देवून क्षीरसागर काका - पुतण्याच्या भूतबंगल्याला उखडून फेकण्याचे आवाहन
बीड : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादच्या जनतेने इतिहास घडवून इम्तियाज जलील यांना निवडून दिले. जलील यांनी तेथील प्रस्थापित शिवसेना नेत्याच्या सत्तेला सुरुंग लावला आता बीडमध्येही शेख शफीकभाऊ शिवसेनेचा पराभव करून औरंगाबादची पुनरावृत्ती करतील असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. क्षीरसागर काका – पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. आता क्षीरसागर काका – पुतण्याच्या भूतबंगल्याला उखडून फेका, त्यांचे नामोनिशाण मिटवा. मजलिस विकास करून दाखवेल असा शब्द देत शेख शफीकभाऊला आमदार करा असे अवाहन ओवेसी यांनी केले.
बीड येथील इजतेमा मैदानावर मंगळवारी सायंकाळी बीड विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार शेख शफीकभाऊ आणि माजलगाव मतदारसंघातील शेख अमर जैनोद्दीन यांच्या प्रचार सभेत ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मतीन, महेफुजुर रहमान ,जिल्हाध्यक्ष शेख निजाम , उमेदवार शेख शफीकभाऊ , शेख अमर यांच्यासह युवक जिल्हाध्यक्ष खयूम इनामदार, नगरसेवक शेख मतीन, हाफिज अश्फाक , समीभाऊ, मोमीन अझहर, हरिसन फ्रांसिस, एजाज इनामदार उर्फ खन्नाभाई,शिवाजी भोसकर, सचिन गाडे, हाजी आयुब पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी खा. ओवेसी म्हणाले , मजलिसला राजकिय वारसा आहे. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यामुळेच आज मजलिस सर्व समाजाची आवाज बनली आहे.
आजही मजलिसवर आरोप होतो की, आम्ही मतांची विभागणी करण्यासाठी निवडणूक लढवितो. मात्र आम्हांला 70 वर्षाच्या राजकीय प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे मजलिस कोणाच्या मालकीची नाही ती सर्व सामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे, त्यामुळेच आम्हाला यश मिळत असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.
एमआयएम सेटिंग करते असा आरोप आमच्यावर केला जातो मात्र नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे , शरद पवार आपल्या सेटिंगचे काय गुपित आहे ? तेही मला एकदा सांगा असे खुले आव्हान ओवेसी यांनी तिघांना दिले. आमच्यावर आरोप करणारे आता स्वतः संपू लागले आहेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पिक्चर दी एन्ड होत असून या दोघांनाही आता भविष्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार तुम्ही सेक्युलर आहात तर मग ट्रीपल तलाखच्या वेळी तुमची धर्मनिरपेक्षता कोठे होती. दिल्लीत एक आणि महाराष्ट्रात एक सेटिंग अखेर कुठपर्यंत तुम्ही मॅचफिक्सिंग करत राहणार असा सवाल खा. ओवेसी यांनी शरद पवारांना विचारला.
यावेळी ओवेसी यांनी तबरेज आणि मॉबलिंचिगच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. बीडमध्ये भूतबंगला आहे. ज्यांचे केवळ 800 मतदान आहे ते बीडवर राज्य करत आहेत. मी दुवाची एक फुक मारली तर या भूतबंगल्यातील सर्व भूत पळून जातील. जयदत्त क्षीरसागर आधी राष्ट्रवादीत होते त्यांनी शिवसेनेत उडी मारली त्यापाठोपाठ आधी आघाडी केलेले संदीप यांनीही राष्ट्रवादीत उडी मारली. हे दोघेही कुलाटी मास्टर आहेत. एका घरात सोबत राहतात, सोबत खातात आणि बाहेर येवून आम्हांला सांगतात तुमची सेटिंग आहे. खरी सेटिंग तर तुमचीच आहे असा आरोप ओवेसी यांनी केला. एक घर बीडचे भविष्य काय सुधारणार असा सवाल करत तुम्ही सर्व एक व्हा आणि मजलिसचा साथ द्या. शफीकभाऊला आमदार करा मग बघा भूतबंगल्याची काय अवस्था होते ती असे सांगून बीडमध्ये शेख शफीकभाऊ आणि माजलगावमध्ये शेख अमर यांच्या पाठीशी ताकद उभी करा. 21 ऑक्टोबर रोजी त्यांच्या पंतग या चिन्हांसमोरील बटन दाबून मजलिसच्या सोबत या असे अवाहन खा. ओवेसी यांनी केले. यावेळी सय्यद मतीन, शेख शफीकभाऊ, शेख निजाम, शेख अमर आदींची भाषणे झाली. या प्रचार सभेस एमआयएमचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
एकाच घरावर दोन झेंडे – शफिकभाऊ
एमआयएमचे उमेदवार शेख शफीकभाऊ म्हणाले, बीडमधील क्षीरसागर काका – पुतणे एक आहेत. त्यांनी आजपर्यंत समाजाला धोका देण्याचेच काम केले आहे. त्यांच्या एकाच घरावर दोन झेंडे आहेत यावरूनच कोण कोणाला मॅनेज आहे ते स्पष्ट होते असेही शफीकभाऊ यांनी सांगितले.
शफीकभाऊंसाठी मेहनत करून दोन्ही क्षीरसागरांचे राजकारण संपवणार – शेख निजाम
बीड मतदारसंघातून खा. ओवेसी यांनी शफीकभाऊंना उमेदवारी दिली.मला तिकीट दिले नाही मात्र मी आणि शफीकभाऊ वेगळे नाहीत,आमच्यासाठी अध्यक्ष खा. ओवेसी यांचा शब्द अंतिम आहे म्हणूनच मी ही होकार दिला. 2016 मध्ये झालेल्या नगर पालिका निवडणूकीप्रमाणेच वातावरण आहे. शफीकभाऊंसाठी मेहनत करणार असल्याचे सांगून कोणात्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. दोन्ही क्षिरसागरांच्या राजकारणाचा धंदा बंद करा.खा. ओवेसी, आ. अकबरोद्दीन आणि खा. इम्तियाज जलील उभा आहेत असे समजून शफीकभाऊ आणि शेख अमर यांना मतदान करा असे आवाहन एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी केले.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर