रणबीर-आलियाच्या प्रेमावर महेश भट्ट म्हणतात…

मुंबई : पोलिसनामा  ऑनलाईन – यंदाचं वर्ष बॉलिवूडसाठी लग्नसराईचं वर्ष ठरत आहे. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक या लोकप्रिय जोड्यांचे विवाह जोरदार पार पडल्यानंतर आता चाहत्यांनाअभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबद उत्साही आहेत.अनपेक्षितपणे एका चित्रपट शूटिंगच्या निमित्ताने या दोघांची जोडी जमली आणि ते एकमेकांना डेट देखील करु लागले.यांची जोडी जमल्यापासून या जोडीने कधीही चाहत्यांपासून किंवा प्रसार माध्यमांपासून त्यांचं नातं लपवलं नाही  हे
 मात्र विशेष . त्यांच्या नात्याविषयी दोघांच्याही कुटुंबियांना माहित असून आलियाचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांनी या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी मान्य केले की त्यांच्या मुलीचे एका बॉलिवूड हिरोसोबत प्रेमप्रकरण सुरू असून ती त्याच्या आकंठ प्रेमात बुडाली आहे. महेश भट्ट यांना देखील रणबीर पसंद असून त्यांनी या नात्याला मान्यता देतांना ते म्हणतात की, रणवीर एक चांगला मुलगा आहे. तसेच दोघंही आपल्या नात्याला पुढे कोणते वळण द्यायचे याबाबत स्वत: निर्णय घेतील ते सुज्ञ आहेत  ते आता मोठे झाले आहेत,  या प्रकरणात बोलण्याचा मला अधिकार नाही असेही महेश भट्ट म्हणाले.पुढे ते असंही म्हणाले, ‘आयुष्य हे आपल्या अटींवर जगायचं असतं. त्यामुळे आपण आयुष्यात काय करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. सध्या या दोघांचं नातं एका चांगल्या वळणावर आहे. मात्र पुढे ते कोणत्या वळणावर जाईल हे माहित नाही. त्यामुळे आपण फक्त प्रतीक्षा करु शकतो’.
दरम्यान, महेश भट्ट यांना रणबीर-आलियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला असला तरी लग्नावर बोलणं टाळलं आहे. ‘ते कोर्ट मॅरेज करणार की पारंपारिक पद्धतीने हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या रिलेशनशिप कसे पुढे जाते, यावर सगळे काही अवलंबून आहे’, केवळ एवढेच ते म्हणाले. विशेष म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार रणबीरच्या कुटुंबातही आलियाला प्रमुख स्थान असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता दोन्ही कुटुंबांनी या नात्याला स्वीकारले असल्याचे चाहते वाट पाहात आहे ती फक्त बँड, बाजा आणि वारातीची.