मलायका आणि अर्जुन एप्रिलमध्ये चर्चमध्ये विवाह करेल. यावर मलायकाने म्हटले आहे की, या सर्व गोष्टी मीडियाने बनवल्या आहेत. त्यामुळे स्पष्ट झाले आहे की हे कपल लग्न करणार नाही. त्याचबरोबर मलायका म्हणाली तिला आपला संसार कधीच संपुष्टात आणायचा नव्हता. प्रत्येकाला एक रिलेशन हवे असते. मला लोक म्हणाले होते की, मी घटस्फोट घायला नको होता. परंतु मी निर्णय घेतला होता. आता मी खूपच खुश आहे. जे झाले ते चांगलेच झाले.
पुढे मलायका म्हणाली, “मला वाटते की, सर्व मूव्ह ऑन करून प्रेम अणि एक साथी मिळवायचा प्रयत्न करतात. कोणी असा ज्याच्यासोबत तुमचे सामंजस्य असेल. जर असे झाले तर तुम्ही लकी आहात. तुम्हाला जीवनात खुश राहण्याची दुसरी संधी मिळाली. काही दिवसांपूर्वी, अर्जुन कपूर एका टॉक शोमध्ये पोहोचला होता. अर्जुनला त्यावेळी विचारण्यात आले की, ‘तू तुझ्या गर्लफ्रेंडला आपल्या कुटुंबीयांशी भेटवणार का ?’ यावर अर्जुन म्हणाला, ‘असे व्हायलाच हवे. खूप काही आहे, जे फॅमिलीत गेल्या महिन्यात घडले आहे. त्यामुळे मला जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला आहे.’