Kolhapur News : कचरा टाकण्याच्या कारणावरून 3 सख्ख्या भावांनी केला तरुणाचा खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरमधील क्रांतिसिंह नाना पाटील नगरमध्ये बुधवारी मध्यरात्री कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाला आहे. कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन सख्ख्या भावांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्या तरुणाचा खून केल्याची घटना घडली. मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. आकाश वांजळे असं मृत तरुणाचं नाव आहे.

वांजळे आणि संशयित आरोपी शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात काही दिवसापासून मतभेद निर्माण झाले होते. बुधवारी सायंकाळी कचरा टाकण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याचे वाद हाणामारीत झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी संशयित भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे या तिघांनी आकाश आनंदा वांजळे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. गंभीर अवस्थेत त्यास सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.