चारित्रयाच्या संशयातून मुलांच्या डोळ्यांदेखत केली पत्नीची हत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम – चारित्रयाच्या संशयावरुन पती पत्नीच्या वादातून एका व्यक्तीने पत्नीला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला लाटण्याने मारून त्यानंतर जमिनीवर आदळल्याची घटना घडली आहे. मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. सयमा असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयमा कुटुंबासमवेत हर्ष विहारमधील सबोली इथे भाड्याच्या घरात राहत होती. पहिला पती बबलूपासून तिला चार मुले होती. बबलूचा एका अपघातात मृत्यू झाल्यानंतर तिने दीड वर्षापूर्वी सयमाने आफताबशी लग्न केले होते. बबलूच्या निधनानंतर, भरपाई म्हणून लाखो रुपये समयाला मिळाले होते. त्यामुळेच आफताबने तिच्याशी लग्न केले होते.

लग्न झाल्यापासून आफताब आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रविवारी दुपारी कुटुंबातील सर्व सदस्य घरी उपस्थित होते. दरम्यान, आफताबने सयमाशी भांडण सुरू केले. आफताबने लहान मुलांसमोर सयमाला मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर आरोपींनी तिला उचलून खाली आपटले. समया बेशुद्ध झाल्यावर त्याने तिचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी सयमाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी जीटीबी रुग्णालयाच्या पाठवला.