आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलीला घरात खेचून नराधमाने केला बलात्काराचा प्रयत्न
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील नालासोपारा येथील पूर्वेकडील भागात धक्कादायक घटना घडली आहे. देशात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून त्या थांबायला तयार नाहीत. अशीच एक घटना नालासोपारा येथे घडली आहे. संतोष भुवन इथं आठवीत शिकणाऱ्या एका मुलीचं अपहरण करण्यात आले असून तिला घरात खेचून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान पीडित मुलीनं आरडाओरडा केला असता तीन मुलांनी तिला त्या नराधमाच्या तावडीतून वाचवलं.
या आरोपीचे नाव इद्रीस शेख (वय ३९) असून त्याने मुलीच्या तोंडावर कपडा टाकून तिला जबरदस्तीनं त्याच्या घरात खेचून नेले आणि तिला धमकावले की, जर माझ्याशी संबंध केले नाहीस तर तुला ठार मारेन. दरम्यान मुलगी खूप घाबरली आणि तिने आरडाओरड केली. तिच्या आवाजाचे शेजारीच राहणाऱ्या तीन मुलांनी धाव घेतली आणि तिची सुटका केली. आरोपी इद्रीस शेख याला तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी इद्रीस शेख याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास देखील सुरु केलाय.
पीडितेच्या पालकांनी आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तेव्हाच असे प्रकार बंद होतील असे पीडितेच्या पालकांनी सांगितले असून त्या नराधमाला फाशी द्यावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ असे देखील सांगितले.
या प्रकरणावर भाजपाचे उपाध्यक्ष विनय पांडे यांनी अत्याचार करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. संतोष भुवन बिलालपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकजण अंमलीपदार्थ सेवन करून धुंद झालेले असतात. त्यामुळे तेथील स्थानिक रहिवासी संदीप मिश्रा यांनी मत मांडले की अशा आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- लसूण औषधी, पण जास्त प्रमाणात खाल्ल्याने होतात ‘या’ ५ समस्या
- दुधात चिमुटभर खसखस टाकून प्या, ‘हे’ आहेत १० आरोग्यदायी फायदे
- रक्तदानाबाबत लोकांमध्ये असतात ‘हे’ ६ गैरसमज ! जाणून घ्या सत्य
- ‘फॅटी लिव्हर’ची समस्या काय आहे ? जाणून घ्या २ प्रकार आणि ४ लक्षणे
- तंबाखूच्या व्यसनामुळे घटते शुक्राणूंची निर्मिती, ‘हे’ आहेत १० गंभीर परिणाम
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय