मेनका गांधी यांचं राहूल गांधींबाबत मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत सध्या एकमेकांबद्दल मोठमोठी वक्तव्ये करण्यात नेतेमंडळी व्यस्त आहे. त्यातच मेनका गांधी यांनी सुल्तानपुर येथील आपल्या प्रचार सभेत राहूल गांधींबाबत असंच एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, राहूल गांधी कधीच पंतप्रधान होऊ शकत नाहीत कारण ते कधी निवडणूक जिंकू शकत नाहीत.

मेनका गांधी यांना यावेळी सुल्तानपुर येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. आपल्या सुल्तानपुर येथील सभेत त्या बोलत होत्या. राहूल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळातील वायनाड येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. मेनका गांधी यांनी राहूल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत तेथे विरोधकांवरही सडकून टिका केली. अमेठीत त्या प्रचार करणार का असा प्रश्न त्यांना सुल्तानपुर येथे आल्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पक्ष मला जेथे म्हणेल तेथे मी प्रचार करणार आहे. असं त्या म्हणाल्या आहेत.