मनोहर पर्रिकर म्हणजे राफेल प्रकरणाचे पहिले बळी

राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचे धक्कादायक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. परंतु गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे.  हे वास्तव्य आहे. असे धक्कादायक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

काल संध्याकाळी दुःखद बातमी आली. त्या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली. गोव्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यावरच नाही तर देशावरही शोककळा पसरली. विशेष म्हणजे त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्रिपदाचा कारभार सांभाळला होता.

ते संरक्षण मंत्री असतानाच लष्कराने पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. पण हे वास्तव आहे. अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

इतकेच नव्हे तर, राफेलची बोलणी सुरु झाल्यानंतर पर्रीकर अस्वस्थ झाले. दिल्लीचे राजकारण आपल्याला जमणार नाही हे त्यांनी ओळखले. त्यामुळेच त्यांनी गोव्यात परतून मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांना त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. परंतु माझ्या मताप्रमाणे हा राफेलचा पहिला बळी आहे असेही त्यांनी म्हंटले.