लोकशाही संपण्याची भीती वाटणार्‍यांनी निवडणुकीत उतरावे : मनोज वाजपेयी

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील लोकशाही धोक्यात असल्याची भीती वाटणार्‍यांनी निवडणूकीत उतरावे असा सल्ला अभिनेता मनोज वायपेयी यांनी दिला आहे. ज्यांना भीती वाटते त्यांनी सरकारविरोधात निवडणुकीत उतरावे असेही त्याने स्पष्ट केले आहे. आरफा खान शेरवानी यांनी घेतलेल्या मुलाखतीत अभिनेता मनोजने उत्तर दिले आहे.

‘भविष्यात देशात लोकशाही असेल की नाही, अशी शंका लोकांना वाटू लागली आहे?,’ असा प्रश्न आरफा खानम शेरवानी विचारला. त्याला मनोज वाजपेयीने उत्तर दिले आहे . मी तज्ज्ञ नाहीये. पण मला असे वाटत की या देशातील लोकशाही कुठेही जाणार नाही. मी खूप आशावादी आहे. मला कळत नाही, लोकांना भीती का वाटू लागली आहे. बघा प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका होतात. ज्यांना भीती वाटतेय, त्यांनी सरकार विरोधात निवडणुकीत उतरावे असे उत्तर त्याने दिले. राजकीय मुद्यांवर मतप्रदर्शन केल्यास कलाकारांना काम मिळणे कमी होत असे मला वाटत नाही. चित्रपटांच्या माध्यमातून राजकारण केले जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला, मी पद्मावत चित्रपट पाहिला. यात आपण जास्तच अभ्यास करायला लागलो नाही का? असा प्रश्न मला पडला. मुघल ए आझम कोणत्याही प्रकारे खरी होती का? जो इतिहास आपण वाचला, त्यांच्याशी तिचा संबंध आहे का? नव्हता. मी पद्मावत चित्रपट बघितला, मला कोणतीही आक्षेप वाटला नाही. मी उरी चित्रपट बघत होतो. त्यातील एक दृश्य बघून रडलो, असेही तो म्हणाला.