चिंताजनक ! पुढील 3 महिन्यांत नवीन नोकऱ्या मिळणं कठीण, केवळ 19 % कंपन्याच करणार फ्रेशर्सची भरती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आर्थिक मंदीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसत आहे. पुढील 3 महिन्यांत फक्त 19 टक्के कंपन्याच फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचा विचार करत आहेत. तर 52 टक्के कंपन्या मनुष्यबळ वाढवू शकत नाही. एका वैश्विक संस्थेच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. वैश्विक संस्था ‘मॅनपावर ग्रुप एम्पलॉयमेंट आउटलुक’ या जागतिक संस्थेचे हे सर्वेक्षण जाहीर केले. या सर्वेक्षणात जवळपास 5131 कंपन्यांशी संपर्क करण्यात आला होता.
केवळ 19% कंपन्याच वाढवणार मनुष्यबळ
देशभरातील 5131 कंपन्यांशी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत आर्थिक स्थिती आणि नव्या नोकऱ्यांच्या शक्यतांबाबत चर्चा केली. त्यात अवघ्या 19 टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ वाढवली जाऊ शकते असं सांगितलं. तर कर्मचारी संख्येत बदल होईल अशी अपेक्षा नाही, असं 52 टक्के कंपन्यांनी स्पष्ट केलं. तर कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत काही सांगू शकत नाही, असं 28 टक्के कंपन्यांनी सांगितलं.
नवीन रोजगारांच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर
नव्या नोकऱ्या निर्माण होण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर राहील असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तिमाहीत नव्या नोकऱ्या निर्माण करण्यात जपान पहिल्या, तैवान दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज आहे.
- तोंडामध्ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्हाला कँसर तर नाही ना
- झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
- ‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे
- ‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्या पद्धती
- सावधान ! जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव
- १५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका
- हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?
- अशी आहे सकाळी उठण्याची योग्य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’
- झोपण्यापूर्वी प्या १ ग्लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे